ताज्या बातम्या महाराष्ट्र

दुग्धविकासमंत्र्यांची घोषणा मात्र प्रत्यक्षात अनुदान नाही, किसान सभेचा आंदोलनाचा इशारा

मुंबई

दूध उत्पादकांना दूधदराबद्दल दिलासा देण्यासाठी प्रति लिटर पाच रुपयाचे अनुदान दिले जाईल अशा प्रकारची घोषणा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहामध्ये केलेली होती. 1 जानेवारीपासून दूध संकलनाचे नवीन मस्टर सुरू होते. या मस्टरमध्ये तरी दूध उत्पादकांना अशाप्रकारे अनुदान मिळेल अशी अपेक्षा दूध उत्पादक शेतकरी बाळगून होते.

मात्र 1 जानेवारी उलटून गेली आणि नवीन मस्टर सुरू झाले तरीसुद्धा अद्याप अशा प्रकारचं अनुदान शेतकऱ्यांना देण्याबद्दल हालचाल झालेली नाही. यावरुन किसान सभेकडून रोष व्यक्त केला जात आहे. दुग्धविकास मंत्र्यांनी शेतकऱ्यांना ५ रुपये अनुदानाची घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात हाती काहीच आलं नसल्याचा आरोप किसान सभेकडून केला जात आहे.

अनुदानाची फाईल अर्थ विभागाकडेच पडून असून याबाबत अर्थ विभागाचा व मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्याशिवाय शासनआदेश सुद्धा काढला जाणार नाही, अशा प्रकारची माहिती समोर आली आहे.

किसान सभेच्या डॉ अजित नवलेंची मागणी –
शेतकरी अडचणीत असताना अनुदान द्यायचे नाही व मार्च दरम्यान लीन सीजन सुरू झाल्यानंतर जेव्हा आपोआप दुधाचे दर वाढतात तेव्हा अनुदान देण्याबाबत भूमिका घ्यायची हा सरकारचा वेळकाढूपणा शेतकरी विरोधी आणि दुध व्यवसायाला अत्यंत मारक आहे. सरकारने अधिक अंत न पाहता उद्या किंवा परवा होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबत अंतिम निर्णय करावा. सहकारी दूध संघांबरोबरच खाजगी दूध संघांना दूध पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा प्रतिलिटर पाच रुपयाचे अनुदान देण्याबाबतचा निर्णय घ्यावा व शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केल्याप्रमाणे प्रति लिटर 34 रुपयाचा दर देणे खाजगी व सहकारी दूध संघांना बंधनकारक करावं तसच पशुखाद्याचे दर कमी करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशा प्रकारची मागणी किसान सभा पुन्हा एकदा करत आहे. सरकारने याबाबत उद्याच्या बैठकीमध्ये ठोस निर्णय न घेतल्यास पुन्हा एकदा महाराष्ट्रभर आंदोलन उभे करण्याचा निर्णय किसान सभा जाहीर करत आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात