महाराष्ट्र ताज्या बातम्या

Devendra Fadnavis: अहिल्यानगरच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय: सात नवीन पोलीस ठाणी, ५५० नवीन पदांची भरती – मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

मुंबई – अहिल्यानगर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात सात नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती केली जाणार असून त्यापैकी एक पोलीस ठाणे मंजूर झाले आहे, तर उर्वरित सहा पोलीस ठाण्यांसाठी मंजुरी प्रक्रियेत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

विक्रम पाचपुते यांनी विधानसभा नियम क्रमांक १०५ नुसार यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. अहिल्यानगर हा विस्तीर्ण जिल्हा असून, येथे गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पोलीस ठाण्यांची संख्या आणि पोलीस कर्मचारी वाढवण्याची गरज असल्याचे पाचपुते यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ५५० नवीन पोलीस पदे भरण्यात येणार आहेत. यामुळे जिल्ह्याची कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट होईल.”

मुख्यमंत्रींच्या या घोषणेमुळे अहिल्यानगरच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात