महाराष्ट्र ताज्या बातम्या

e-Governance : डिजिटल गव्हर्नन्स काळाची गरज – मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ई-गव्हर्नन्स’ साठी सामंजस्य करार

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग आणि ‘समग्र’ संस्थेमध्ये आज ‘ई-गव्हर्नन्स’ सुधारणा गतीमान करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार झाला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “डिजिटल गव्हर्नन्स ही आता केवळ सोयीची गोष्ट राहिली नसून काळाची गरज बनली आहे. सर्व शासकीय योजना आणि सेवा ऑनलाईन प्रणालीद्वारे नागरिकांपर्यंत सहज पोहोचणार आहेत.”

‘नो ऑफिस डे’ सारख्या उपक्रमांमुळे नागरिकांना कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता राहणार नाही. भविष्यात शासकीय सेवा व्हॉट्सॲपसारख्या सुलभ प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतील. यासाठी प्रत्येक विभागाने आपली उद्दिष्टे, कालमर्यादा आणि अंमलबजावणीची स्पष्ट रूपरेषा ठरवावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

नागरिकांचा सक्रीय सहभाग आणि शासन-नागरिक यांच्यातील समन्वयामुळे सेवा प्रभावीपणे पोहोचतील आणि शासनाचे सकारात्मक ब्रँडिंगही घडेल. या करारामुळे शासकीय व्यवस्थेत मूलभूत व दीर्घकालीन परिवर्तन घडणार आहे.

या प्रसंगी मंत्री ॲड. आशिष शेलार, समग्रचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव गोयल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात