महाराष्ट्र ताज्या बातम्या

Eknath Shinde on Rahul Gandhi : राहुल गांधींचे आरोप निराधार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेले मत चोरीचे आरोप संपूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट करत, “शंका असल्यास निवडणूक आयोगाकडे प्रतिद्यापत्र सादर करावे, पत्रकार परिषद घेऊन नुसते आरोप करणे योग्य नाही,” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

राहुल गांधी यांनी मतदारांची नावे वगळून मतदारसंख्या कमी केल्याचा आरोप केला होता. यावर प्रत्युत्तर देताना शिंदे म्हणाले की, “मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी ठरावीक प्रक्रिया असते, ती एका दिवसात किंवा अचानक होऊ शकत नाही.”

शिंदे म्हणाले, “आजच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी हायड्रोजन बॉम्ब टाकणार होते, पण ते करायला विसरले.” राहुल गांधी यांनी कर्नाटकातील आलांड मतदारसंघातील ६,०१८ मतदार कमी झाल्याचा आरोप केला होता. मात्र २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचेच भोजराज पाटील विजयी झाले होते, याची आठवण शिंदे यांनी करून दिली.

राहुल गांधी पराभव झाल्यावर कायम ईव्हीएम, मतदार यादी आणि निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, असे शिंदे म्हणाले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “ईव्हीएमद्वारे निवडणुका घेण्याची सुरुवात काँग्रेसच्या काळात, यूपीए-२ च्या कार्यकाळातच झाली. त्यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान होते. आज ज्या प्रक्रियेतून देशभर निवडणुका घेतल्या जातात, त्याच प्रक्रियेतून कर्नाटक, तेलंगणा, पंजाबमध्येही काँग्रेसचे सरकार निवडून आले. मग तिथे प्रक्रिया योग्य आणि इथेच चुकीची कशी?” असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रातील निवडणुका पारदर्शकरित्या झाल्या असून गेल्या तीन वर्षांत महायुती सरकारने केलेल्या कामांच्या जोरावर मतदारांनी भरभरून पाठिंबा दिला, असे शिंदे म्हणाले. “जनतेने दिलेल्या या कौलावर आक्षेप घेणे म्हणजे जनमताचा अनादर आहे,” असे ते ठामपणे म्हणाले.

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात