महाराष्ट्र ताज्या बातम्या

किमान सरकारने चहापानाचा कार्यक्रम रद्द करायला हवा होता

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची खंत

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या नुकत्याच झालेल्या विमानदुर्घटनेतील दुर्दैवी निधनानंतरही, राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याने नाराजी व्यक्त केली आहे.

आपले नाव न छापण्याच्या अटीवर बोलताना या नेत्याने सांगितले की, “अजित पवार यांच्या अकाली निधनाने राज्यातील सर्वसामान्य जनता, विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते अजूनही शोकातून पूर्णपणे सावरलेले नाहीत. अशा वातावरणात किमान सरकारने हा कार्यक्रम रद्द करणे अपेक्षित होते,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या नेत्याच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक शोकसभांमध्ये अजित पवार यांच्याबद्दल आदरभाव व्यक्त केला होता. मात्र, शोककाळातही सरकारने नियोजित कार्यक्रम कायम ठेवल्याने काही कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांनी पुढे नमूद केले की, राज्याच्या राजकीय परंपरेनुसार, सरकारमधील एखाद्या ज्येष्ठ नेत्याच्या निधनानंतर काही काळ सार्वजनिक कार्यक्रमांबाबत संयम पाळला जातो. “अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम हा एक अलिखित संकेत मानला जातो, पण गेल्या अनेक वर्षांत विरोधी पक्षांनी त्यावर बहिष्कार घालण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द केला असता, तो एक संवेदनशील निर्णय ठरला असता,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

या नेत्याने हेही स्पष्ट केले की, या कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध झालेले छायाचित्रे पाहून काही कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याची चर्चा आहे. मात्र, या बाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

दरम्यान, या घडामोडींवर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात