महाराष्ट्र ताज्या बातम्या

IT Industry: हिंजवडीतील आयटी उद्योग बंगळुरुला गेला, अजित पवारांनी राजीनामा द्यावा – काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

मुंबई –हिंजवडीतील आयटी उद्योग बंगळुरु व हैदराबादकडे स्थलांतर करत असताना उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार झोपेत होते का? असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी यासंदर्भात अजित पवारांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

काँग्रेसच्या मते, पुण्याची औद्योगिक अधोगती, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि कोलमडलेली वाहतूक व्यवस्था यामुळे आयटी कंपन्या राज्याबाहेर जात आहेत.

“वेदांता फॉक्सकॉनसारखी मोठी गुंतवणूक गुजरातकडे गेली, आता हिंजवडीतील कंपन्याही जात आहेत. अजित पवार यांनी स्वतः कबुली दिली आहे, मग जबाबदारी कोणाची?” असे सपकाळ म्हणाले.

त्यांनी सरकारवर हल्लाबोल करत सांगितले की, “हे सरकार केवळ हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करून खोके गोळा करण्यात व्यस्त आहे. ही आका व खोके संस्कृतीच महाराष्ट्राला बरबाद करत आहे.”

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात