महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahad : रस्त्यावर अपघातांचे खडीकरण! महाड पीडब्ल्यूडीचा अनोखा प्रयोग

महाड: महाड-दापोली राज्य मार्गावर अपघातांची मालिका सुरु असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने अपघात प्रवण क्षेत्रांवर रस्ता सुरक्षेसाठी अजब उपाय सुरू केला आहे. अवकाळी पावसात डांबरीकरणाच्या निकृष्ट दर्जामुळे रस्ता घसरत असल्याने अपघात वाढले. तरीही विभागाने आता या रस्त्यावर केवळ खडी टाकून ती रोलरने दाबण्याचा ‘प्रयोग’ सुरू केला आहे. या ‘तंत्रज्ञानामुळे’ रस्ता खडबडीत होऊन अधिक अपघात घडण्याचा धोका वाढल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

एप्रिल महिन्यात या मार्गावर फक्त डांबर टाकून त्यावर ग्रिटचा मुलामा करण्यात आला. पावसात डांबर उखडल्याने रस्ता गुळगुळीत झाला आणि त्यातच करंजाडी-बुद्धवाडी भागात मिनीडोअर व आयशर टेम्पोच्या अपघातात दोन जण मृत्युमुखी पडले, तर आठ जण गंभीर जखमी झाले. त्यानंतर स्वारगेट-विन्हेरे एसटी बसचा अपघात होऊन चालकासह ७ प्रवासी गंभीर जखमी झाले.

या अपघात मालिकेला सोमवारी पुन्हा सुरूवात झाली. सकाळी १० वाजता ईर्टीका कार व सिमेंट ट्रक एकमेकांवर आदळले. वाहन रस्त्यावरून घसरल्याने हा अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

शिरगाव फाटा ते लाटून हद्दीत रेवतळे, आंग्रे, कोंड भागातही मालवाहू टेम्पोंचे अपघात घडले आहेत. शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारावर अपघातास जबाबदार ठरवत तक्रार केली होती. त्यानंतर महाड सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता सनाळकर यांनी अचानक जागरूक होऊन गुळगुळीत रस्त्यावर खडी टाकून ती रोलरने दाबण्याचा प्रयोग सुरू केला आहे.

परंतु हे ‘नवीन तंत्रज्ञान’ आणखी अपघात घडवणार की सुरक्षितता वाढवणार – असा सवाल उपस्थित होत आहे. डांबरीकरणाच्या त्रुटी दुरुस्त करण्याऐवजी अपघात प्रवण क्षेत्र खडबडीत करून रस्ता ‘सुरक्षित’ करण्याचा अजब प्रयोग नक्की कोणाच्या सूचनेने केला जातोय, हे देखील स्पष्ट नाही.

नागरिकांचा सवाल:
या मार्गावर अपघात रोखण्यासाठी शास्त्रोक्त उपाय आवश्यक असताना, खडी टाकून ती रोलरने दाबण्याचे प्रयोग करून अपघातांना निमंत्रण दिले जात आहे. याची जबाबदारी कोण घेणार?

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात