महाराष्ट्र ताज्या बातम्या

“गणित गुरुवार” उपक्रमाने महापालिकेच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास नियमित होणार

दर गुरुवारी रात्री ८ ते १० दरम्यान किमान ३० मिनिटे खान अकॅडमी प्लॅटफॉर्मवर गणित सराव अनिवार्य

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचा गणित विषयात आत्मविश्वास वाढवण्यासाठी ‘मिशन मेरिट’ उपक्रमांतर्गत एक अभिनव पाऊल उचलण्यात आले आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ६ वी ते १० वीमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी “गणित गुरुवार” उपक्रम राबवण्यात येणार असून, प्रत्येक गुरुवारी रात्री ८ ते १० या वेळेत किमान ३० मिनिटे खान अकॅडमी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सराव अनिवार्य करण्यात आला आहे.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उपआयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या माध्यमातून गणित विषयात शिस्त, सातत्य आणि प्रावीण्य निर्माण करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

खान अकॅडमीच्या आंतरराष्ट्रीय आकडेवारीनुसार आठवड्यात फक्त ३० मिनिटांचा नियमित सराव देखील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे “गणित गुरुवार” उपक्रमातून शाळा आणि घरी दोन्हीकडे अभ्यासाचे संस्कार रुजतील, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.

या उपक्रमाच्या यशासाठी पालक-शिक्षक सभा (PTM), व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप व शिक्षक-पालक संवादाचा उपयोग करून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची सवय निर्माण केली जाणार आहे. प्रत्येक गुरुवारी शिक्षक विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना सरावाची आठवण करून देतील. त्यानंतर विद्यार्थ्यांनी खान अकॅडमी प्लॅटफॉर्मवर लॉग इन करून दिलेल्या असाइनमेंट पूर्ण कराव्यात. विद्यार्थ्यांनी दिलेला वेळ, सरावाची पातळी आणि प्रगती याची नोंद ठेवली जाईल. शिक्षण विभाग त्यावर नियमितपणे पाठपुरावा करेल.

“गणिताची भीती दूर करून आत्मविश्वास निर्माण करणे, हेच या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे,” असे उपआयुक्त डॉ. प्राची जांभेकर यांनी सांगितले. तसेच, पालक व शिक्षक या दोघांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात