महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबईत दूध तपासणी मोहीम; 98 वाहने अडवून 1.83 लाख लिटर दुधाची तपासणी

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकांनी विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत १२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री मुंबईतील चारही चेक नाक्यांवर मोठी तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत ९८ दूध वाहने अडवून तब्बल १.८३ लाख लिटर दुधाची तपासणी करण्यात आली.

मानखुर्द चेक नाक्यावर कमी प्रतीचे दूध आढळल्याने एक वाहन परत पाठवण्यात आले. या प्रकरणी संबंधित ठिकाणी अधिक तपास करून कारवाई केली जाईल, अशी माहिती मंत्री झिरवाळ यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शंभर दिवसांत ठोस काम दाखवण्याच्या सूचना दिल्या आहेत, आणि त्यानुसार आमचा विभाग जबाबदारीने काम करत आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

१२ फेब्रुवारीच्या मोहिमेचा तपशील:
• मुलुंड चेक नाका – १३ वाहने
• मानखुर्द चेक नाका – ४१ वाहने
• दहिसर चेक नाका – १९ वाहने
• ऐरोली चेक नाका – २५ वाहने
• एकूण दूध साठा: १,८३,३९७ लिटर
• किंमत: ९ कोटी ६ लाख ८३२ रुपये
• नमुने तपासणी: १०६८
• सोडियम क्लोराईड आढळलेले नमुने: १०९
• साखर आढळलेला नमुना: १

झिरवाळ यांनी सांगितले की, दूध तपासणीपासून ही मोहीम सुरू झाली असून, पुढे प्रत्येक खाद्यपदार्थ तसेच घरगुती वापरातील वस्तूंची भेसळ आहे का, याचीही चौकशी केली जाईल. विभागात ५२% पदे रिक्त असल्याने लवकरच नव्या भरतीला मंजुरी दिली जाणार आहे. याशिवाय, सध्याच्या कायद्यात आवश्यक सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत लवकरच चर्चा होईल, असे त्यांनी सांगितले.

राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ पक्षातच राहतील आणि शरद पवार हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष म्हणूनच कार्यरत राहतील, असेही झिरवाळ यांनी स्पष्ट केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात