महाराष्ट्र ताज्या बातम्या

Monsoon Session : तिसऱ्या आठवड्यात पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरे आणि निलेश राणे यांच्यात तुंबळ शाब्दिक चकमक

मुंबई – पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत वातावरण चांगलेच तापले. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करत ‘चड्डी बनियन गँग’ असा उल्लेख केला, त्यामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे आमदार निलेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, “हिम्मत असेल तर थेट नाव घ्या,” असे खुले आव्हान दिले. त्यामुळे सभागृहाचे वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले.

आदित्य ठाकरे म्हणाले, “सध्याचे सरकार युती टिकवण्यासाठी काहीही सहन करत आहे. ‘चड्डी बनियन गँग’ राज्यात सक्रिय आहे. हे लोक कुणालाही धमकावतात, मारतात, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. तरीही मुख्यमंत्र्यांनी मोठी सहनशीलता दाखवली आहे.” या वक्तव्याच्या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टोला लगावला.

यावर प्रतिक्रिया देताना निलेश राणे म्हणाले, “जर हिंमत असेल तर आदित्य ठाकरे यांनी चड्डी कोण आणि बनियन कोण, हे स्पष्टपणे सांगावं. उगाच पब्लिसिटीसाठी आणि मीडियासाठी अशी विधाने करणं योग्य नाही. सभागृह हे जबाबदारीने बोलण्याचं स्थान आहे,” अशा शब्दांत त्यांनी आदित्य ठाकरेंना सुनावले.

आदित्य ठाकरे यांनी ‘चड्डी बनियन गँग’ असा उल्लेख करत आमदार संजय गायकवाड प्रकरणाचाही अप्रत्यक्ष संदर्भ दिला. काही दिवसांपूर्वी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप गायकवाड यांच्यावर झाला होता.

या वादामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारविरोधक आणि सत्ताधारी पुन्हा आमनेसामने आले आहेत. पुढील काही दिवस या वादाची अधिवेशनावर छाया राहील, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. ‘चड्डी बनियन गँग’ या उल्लेखामुळे राज्याच्या राजकारणात नव्या संघर्षाला तोंड फुटल्याचे मानले जात आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात