मुंबई : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर गावाचे ‘ईश्वरपूर’ असे नामकरण करण्याच्या मागणीला अखेर मंजुरी मिळाली आहे. राज्य सरकारने याला मान्यता दिल्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत केली.
भुजबळ म्हणाले, “इस्लामपूर गावाचे ‘ईश्वरपूर’ असे नामांतर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. हा विषय केंद्राच्या अखत्यारीत येत असल्याने राज्य सरकारने केंद्राला शिफारस केली आहे. केंद्र सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर ‘इस्लामपूर’चे नाव अधिकृतपणे ‘ईश्वरपूर’ असे होईल.”
या नामांतराची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. आता हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे.