महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबई फेरीवाल्यांच्या प्रश्नावर विधानसभेत गदारोळ; ‘पात्रांना जागा द्या, बेकायदेशीरांना रोखा’ – अध्यक्ष नार्वेकर  

मुंबई: मुंबईत पथविक्रेता कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत तीव्र गदारोळ झाला. लक्षवेधी सूचनेदरम्यान विरोधी सदस्यांनी पात्र फेरीवाल्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत सरकारवर टीका केली. तर सत्तारूढ सदस्यांनी शहरात बेकायदेशीर फेरीवाल्यांना घुसविण्याचा गंभीर आरोप केला.

ही लक्षवेधी सूचना सदस्य Rais Shaikh यांच्यासह पाच सदस्यांनी मांडली होती.

यावर उत्तर देताना उद्योगमंत्री Uday Samant यांनी सांगितले की, या विषयावर न्यायालयात अलीकडेच सुनावणी झाली असून शासन पात्र फेरीवाल्यांच्या प्रश्नाबाबत गंभीर आहे. कोणी अवैध पद्धतीने व्यवसाय करत असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. अंतिम निर्णय येईपर्यंत पात्र फेरीवाल्यांना विशेष झोनमध्ये जागा देण्याचे निर्देश महापालिकेला दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र या उत्तरावर विरोधी सदस्य Amin Patel यांच्यासह काही सदस्यांनी आक्षेप घेत गदारोळ केला. दरम्यान भाजप सदस्य Ameet Satam यांनी बेकायदेशीर घुसखोरांबाबत गंभीर आरोप मांडले.

सभागृहातील वातावरण तापल्यानंतर विधानसभा अध्यक्ष Rahul Narwekar यांनी हस्तक्षेप करत पात्र फेरीवाल्यांना न्याय मिळाला पाहिजे, असे स्पष्ट केले. तसेच पथविक्रेता कायद्याची अंमलबजावणी २०१४ पासून का झाली नाही, याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

पात्र फेरीवाल्यांची व्यवस्था करताना एकही बेकायदेशीर व्यक्ती त्यात समाविष्ट होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात