मुंबई

बदलापूरमधील अत्याचारप्रकरणी मविआचा ‘महाराष्ट्र बंद’

X : @NalawadeAnant

मुंबई – बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर (Badlapur incident) झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूरमधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर व मन सुन्न करणारी घटना घडली ती शाळा भाजपा – राष्ट्रीय स्वयंसेवक (BJP-RSS) संघाशी संबंधित आहे. या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध नसल्याने येत्या २४ तारखेला महाभ्रष्ट युती सरकारविरोधात महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. जनतेने मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना केले.

बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेने राज्यातील महिला मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या बैठकीत जागावाटपावर (seat sharing discussions) होणारी चर्चा रद्द करून राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या (atrocities against women) वाढत्या घटना आणि महिला सुरक्षेवर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना बदलापूरच्या घटनेवर संताप व्यक्त करत पटोले म्हणाले की, भाजपा (BJP) युती सरकारला (Maha Yuti government) सत्तेची गुर्मी चढली आहे. महिला अत्याचारांचे प्रमाण राज्यात प्रचंड वाढलेले असतानाही सरकार आपल्यात मस्तीतच आहे. लाडकी बहिण (Ladki Bahin Yojna) म्हणून १५०० रुपये देण्यासाठी मोठ मोठे इव्हेंट केले जात आहेत, पण बहिणींची सुरक्षा केली जात नाही. राज्य सरकार, गृह खाते, शासन आहे की नाही अशी परिस्थिती आहे.

बदलापूरच्या घटनेत पोलीसांच्या (Badlapur police) भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून तक्रार दाखल करण्यास गेलेल्या पीडित मुलीच्या आईला तासनसात पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले. त्यामुळे पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत, सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, अशा प्रश्नांची सरबत्ती पटोले यांनी सरकारवर केली. 

दोषीवर कठोर कारवाई करावी यासाठी बदलापूरमध्ये लोकांनी मोठे जनआंदोलन केले, पण ते आंदोलनही दडपण्याचा प्रयत्न केला. राज्यात बाल अत्याचारांच्या घटनाही वाढल्या आहेत. भाजपा युती सरकार अत्यंत अकार्यक्षम, भ्रष्ट सरकार असल्याने सरकारला जागे करण्यासाठी २४ तारखेला महाराष्ट्र बंद ची (Maharashtra Band) हाक दिली असून या बंदमध्ये मविआमधील (MVA) सर्व घटक पक्ष सहभागी होणार आहेत. बदलापुरच्या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी डॉक्टर, वकील, पालक यांनीही या बंदमध्ये सहभागी होऊन सरकारच्या विरोधात आवाज बुलंद करावा या आवाहनाचा पुनरुच्चारही पटोले यांनी केला.

Avatar

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
मुंबई

उद्धव सेनेच्या मुंबईतील राजकीय ताकदीपुढे भाजपची शरणागती: सिनेट निवडणूक पुढे ढकलली

Twitter : @vivekbhavsar मुंबई : शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केल्यानंतर देखील मुंबईत शिवसेनेचा पराभव