महाराष्ट्र ताज्या बातम्या

नाशिक मनपातील कंत्राटी कामगारांचे वेतन लंपास प्रकरण; दोषींवर फौजदारी कारवाई होणार – मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

मुंबई – नाशिक महानगरपालिकेच्या विविध सेवांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांच्या वेतनातून अवैधरित्या रक्कम कापणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. तसेच संबंधित ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात येईल आणि दोन महिन्यांत कामगारांच्या हितासाठी ठोस धोरण जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभा नियम १०५ अंतर्गत या विषयावर लक्षवेधी सूचना दिली होती. त्यांनी सभागृहात गंभीर आरोप करताना सांगितले की, नाशिक मनपात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांची बँक खाती उघडली जातात. परंतु त्यांचे एटीएम कार्ड ठेकेदारांकडे राहते आणि दरमहा प्रत्येकी १० हजार रुपये त्यांच्या खात्यातून काढून घेतले जातात. हे पैसे ठेकेदार व मनपा अधिकारी आपसात वाटून घेतात. ही संघटित आर्थिक लूट असून पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. फरांदे यांनी यासंदर्भातील सर्व पुरावे पेन ड्राईव्हमध्ये दिल्याचेही सभागृहात स्पष्ट केले.

उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषय आहे. कोणत्याही कामगाराचे शोषण होऊ दिले जाणार नाही. जे कोणी दोषी असतील – ठेकेदार असोत वा मनपा अधिकारी – त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. याशिवाय, कंत्राटी कामगारांना त्यांचे संपूर्ण वेतन आणि कामाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी कामगार विभागाच्या सचिवांमार्फत दोन महिन्यांत ठोस धोरण निश्चित केले जाईल.”

मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे नाशिकमधील कंत्राटी कामगारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे, तर दोषींवर कडक कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात