महाराष्ट्र ताज्या बातम्या

NCC Academy: राज्यात स्वतंत्र ‘एनसीसी अकॅडमी’ उभारणार – क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई: शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची गोडी निर्माण करण्यासाठी तसेच सैन्याकडे ओढा वाढविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात लवकरच स्वतंत्र “एनसीसी अकॅडमी” उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना केली.

या प्रशिक्षण संस्थेसाठी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात जागा उपलब्ध करण्याच्या सूचना क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आज मंत्रालयात एनसीसीच्या प्रलंबित प्रश्नांवर झालेल्या बैठकीस अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी, उपसचिव सुनील पांढरे, तसेच भारतीय नौदल छात्र सेनेचे संचालक कॅप्टन जेनीश जॉर्ज उपस्थित होते. बैठकीदरम्यान एनसीसी विद्यार्थ्यांनी बनविलेली भारतीय नौदल युद्धनौकेची प्रतिकृती मेजर जनरल त्यागी यांनी क्रीडामंत्र्यांना सादर केली.

राज्यातील एनसीसी विद्यार्थी विविध कॅम्प, क्रीडा स्पर्धा आणि उपक्रमांत राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. एनसीसीचे ‘सी सर्टिफिकेट’ सैन्यदल, पोलीस दल तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात महत्त्वाचे ठरत असल्याने विद्यार्थ्यांना उत्तम करिअर संधी उपलब्ध होत आहेत.

क्रीडामंत्री कोकाटे यांनी सांगितले की, भविष्यात महाविद्यालयांमध्ये एनसीसी प्रशिक्षण केंद्रांची संख्या वाढविणे, तसेच आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठीही क्रीडा विभागाला सूचनावजा निर्देश देण्यात आले आहेत.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात