मुंबई–राज्यातील महायुती सरकारने हैदराबाद गॅझेटच्या तरतुदी मान्य करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आदेश काढला आहे. जर सरकार खरोखर गॅझेट लागू करणार असेल, तर तेलंगणा सरकारप्रमाणे जातनिहाय जनगणना करून ओबीसींना ४२% आरक्षण देणार का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले, “मराठा व ओबीसी समाजात आरक्षणावरून संघर्ष निर्माण झाला आहे. सरकार म्हणते मराठ्यांना ओबीसी आरक्षण दिले तरी ओबीसींच्या हक्काला धक्का बसणार नाही. पण हे दोन्ही एकत्र कसे शक्य आहे? फडणवीसांच्या घोषणांवर किती विश्वास ठेवायचा हा खरा प्रश्न आहे.”
सपकाळ यांनी पुढे आरोप केला की, “भाजपा सरकारला आरक्षणाच्या नावाखाली समाजात फूट पाडायची आहे. खरा तोडगा फक्त जातनिहाय जनगणनेत आहे, पण सरकार त्याप्रती गंभीर नाही.”