महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची दुरवस्था; कामगारांना शारीरिक व्याधींचा धोका

शिवसेना कामगार सेना रायगड जिल्हाध्यक्षांचा इशारा: ‘आठ दिवसांत खड्डे बुजवा, अन्यथा तीव्र आंदोलन!’

महाड — महाड औद्योगिक वसाहतीतील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून अपूर्ण असल्याने परिसरातील कामगार आणि नागरिकांचे हाल होत आहेत. रस्त्यांवरील प्रचंड खड्डे, धुळीचे साम्राज्य आणि दुर्लक्षामुळे कामगारांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, याविरोधात शिवसेना कामगार सेना रायगड जिल्हाध्यक्ष सुभाष मोरे यांनी थेट प्रशासनाला जाब विचारला आहे.

रोजच्या प्रवासात धोक्याचा रस्ता आणि आजारांचा साथीदार

मोरे यांनी सांगितले की, “रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे कामगारांना कामावर ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. एवढ्या प्रमाणात रस्ते खचले आहेत की, कामगारांमध्ये कंबरदुखी, गुडघेदुखी आणि मानेच्या वेदना वाढल्या आहेत. सतत उडणाऱ्या धुळीमुळे श्वसनाचे आजार आणि डोळ्यांच्या तक्रारीही वाढल्या आहेत.”

महाड एमआयडीसीच्या मुख्य क्षेत्रासोबतच ॲडिशनल औदुंबर शाळा परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावरून वाघेरी, वारंगी, पाने, मांगरूण, दापोली, पंदेरी, वाघोळी, देवघर, दहिवड, वाकी, शेवते, आमशेत, सोलम कोंड आणि वाळण या गावांतील नागरिक व कामगार दररोज प्रवास करतात — आणि त्यांनाच या दुरवस्थेचा सर्वाधिक फटका बसतो आहे.

“ठेकेदारांवर मेहरबानी थांबवा; अन्यथा रस्त्यावर उतरणार!”

मोरे यांनी प्रशासन आणि ठेकेदार दोघांनाही थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले, “ठेकेदार फक्त तात्पुरती मलमपट्टी करून काम भागवतात. त्यामुळे समस्येचा कायमस्वरूपी तोडगा निघत नाही. ठेके कोणाला आणि कशा अटींवर देण्यात आले, याची सखोल चौकशी करावी लागेल.”

मोरे यांनी एमआयडीसी प्रशासनाला आठ दिवसांची अंतिम मुदत देत स्पष्ट इशारा दिला — “जर आठ दिवसांत रस्त्यांवरील खड्डे बुजवले नाहीत आणि दुरुस्ती सुरू झाली नाही, तर शिवसेना कामगार सेना रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल.”

स्थानिकांचा संताप, प्रशासन मौन

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर असूनही कामाचा वेग अत्यंत मंद आहे. धुळीमुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना त्रास होत आहे. नागरिकांच्या समस्या प्रशासनाकडून गांभीर्याने घेतल्या जात नसल्याने आता कामगार सेनेचे आंदोलनच एकमेव पर्याय राहिला आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात