महाराष्ट्र ताज्या बातम्या

Renewable Energy: मुंबईत पत्रकारांसाठी राष्ट्रीय कार्यशाळा : नूतनीकरणीय ऊर्जा विषयावर माहितीची पर्वणी

मुंबई– मुंबई मराठी पत्रकार संघ आणि इंटरन्यूजच्या ‘अर्थ जर्नलिझम नेटवर्क’ (EJN) यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते १८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान नूतनीकरणीय ऊर्जेवरील राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी तामिळनाडू, महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेशातील पत्रकार व संवादकांना प्राधान्य दिले जाणार असून अर्ज करण्याची अंतिम मुदत १४ सप्टेंबर २०२५ रात्री १२ वाजेपर्यंत आहे.

भारताने नुकताच १०० गिगावॅट सौर ऊर्जा उत्पादन क्षमतेचा टप्पा पार केला असून जुलै अखेरीस एकूण ११९ गिगावॅट सौर, ५२ गिगावॅट पवन आणि १० गिगावॅट जैवइंधन आधारित ऊर्जा निर्मिती केली आहे. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या कार्यशाळेत ऊर्जा संक्रमणातील यश, आव्हाने आणि पुढील दिशा यावर सखोल चर्चासत्रे होणार आहेत.

या तीन दिवसीय कार्यशाळेत निवड झालेल्या पत्रकारांना संशोधक, उद्योग तज्ज्ञ व धोरणकर्त्यांकडून थेट मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्पांना भेटीची संधी मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांच्या प्रवास, निवास आणि भोजनाची सोय आयोजकांकडून केली जाणार आहे.

पात्रता व अटी:
– कार्यशाळेचे सर्व दिवस उपस्थित राहणे आवश्यक.
– विज्ञान, पर्यावरण, ऊर्जा वा उद्योग विषयांवर अहवाल सादर केल्याचा अनुभव असावा.
– इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.
– नूतनीकरणीय ऊर्जा विषयातील रुची अनिवार्य.
– दोन कामांचे नमुने किंवा लिंक्स जोडणे आवश्यक.
– वरिष्ठ अथवा पर्यवेक्षक यांची संमतीपत्र आवश्यक.

महिला, दलित, आदिवासी, अपंगत्व असलेले तसेच करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यातील पत्रकारांना विशेष प्रोत्साहन दिले जाईल.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने ‘apply now’ बटनावर क्लिक करून करता येईल. कोणतीही अडचण आल्यास info.ejn@internews.org या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अंतिम मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात