महाराष्ट्र ताज्या बातम्या

कल्याण पश्चिमेतील रखडलेले पुनर्विकास प्रकल्प पुन्हा मार्गी लागण्याच्या दिशेने; माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या मॅरेथॉन बैठकांना नागरिकांचा प्रतिसाद

कल्याण: कल्याण पश्चिममधील अनेक वर्षांपासून ठप्प पडलेले पुनर्विकास प्रकल्प पुन्हा सुरू होण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या असून, या प्रकल्पांतील शेकडो रहिवाशांनी माजी आमदार नरेंद्र पवार यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. शनिवारी दिवसभर पवार यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रकल्पांच्या रहिवाशांसोबत मॅरेथॉन बैठकांचा धडाका लागला, ज्यामध्ये पवार यांनी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.

चिकणघर येथील बैठकीने निर्माण केला विश्वासाचा किरण

गेल्या आठवड्यात चिकणघर येथील १४ वर्षांपासून रखडलेल्या म्हाडा पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. यामध्ये ४५० हून अधिक कुटुंबीय सहभागी झाले होते. या बैठकीतून निर्माण झालेला आशावाद माध्यमांतून पसरला आणि त्यामुळे इतर प्रकल्पांतील रहिवाशांनीही नरेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधला.

रहिवाशांच्या व्यथांना न्याय देण्याचा पवारांचा निर्धार

श्री कॉम्प्लेक्स, रवी उदय सोसायटी, पटेल ग्रुप, म्हाडा एमआयजी प्रकल्प अशा ठिकाणांतील रहिवाशांसोबत पवार यांनी स्वतंत्र बैठक घेतली. पटेल ग्रुपमधील २५० हून अधिक लाभार्थी गेली १४ वर्षं हप्ते भरत असूनही घराच्या प्रतिक्षेत आहेत. टायकून ग्रुपमधील ४०० हून अधिक नागरिकांनी फसवणुकीविरोधात न्यायाची मागणी केली.

“राज्यात आमचेच सरकार आहे. तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मी १०० टक्के तुमच्या पाठीशी आहे,” असे आश्वासन नरेंद्र पवार यांनी यावेळी दिले.

बांधकाम व्यावसायिकाच्या दबावाला न जुमानता पाहणी

रखडलेल्या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पवार यांना संबंधित बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांकडे पत्र देऊन रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणताही दबाव न स्वीकारता पवार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि नंतर रहिवाशांशी संवाद साधला.

“न्याय नाही, तर मतदान नाही” – रहिवाशांचा सरकारला इशारा

या रखडलेल्या प्रकल्पांमुळे वैतागलेले रहिवासी म्हणाले की, “राज्य सरकारने न्याय दिला नाही, तर आगामी महापालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षाविरोधात मतदान करू.” याआधी लोकसभा निवडणुकीतही त्यांनी बहिष्काराचा इशारा दिला होता. आजही ते न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात