महाराष्ट्र ताज्या बातम्या

राजकीय स्वार्थासाठी सुरु असलेली भोंदूगिरी थांबवा !

मंत्री, मुंबई भाजपा अध्यक्ष अँड आशिष शेलार यांचा उबाठावर पलटवार

मुंबई : बांगलादेशी घुसखोर वांद्रे पश्चिम पर्यंत आलेत वांद्रे पुर्वेकडे पोहोचायला वेळ लागणार नाही. म्हणून राजकीय स्वार्थासाठी सुरु असलेली भोंदूगिरी थांबवा, असा सल्ला देत माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी उबाठा गटावर हल्लाबोल केला आहे.

अभिनेते सैफ अली खान यांच्या घरी घुसून हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचे समोर आल्यानंतर उबाठा गटाकडून भाजपाला लक्ष करण्याचा प्रयत्न झाला. त्याला उत्तर देताना अँड आशिष शेलार यांनी आपल्या “एक्स” पोस्टमधून उबाठावर जोरदार पलटवार केला आहे.

अँड आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात पहा चमत्कार ..भोंदू हिंदुत्ववाद्यांचे ऐका नवे फुत्कार. बांग्लादेशी घुसखोर बांद्रयापर्यंत आले म्हणून उबाठाचे “छोटे आणि मोठे” आज केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या नावाने बोटं मोडत आहेत…? वरुन आम्ही हिंदुत्व सोडले नाही म्हणून नेहमीच्या फुसक्या सोडायला पण विसरत नाही ?
सभेत दाखवण्यापुरते हातात रुद्राक्षांच्या माळा घालून फिरणाऱ्या महाराष्ट्रातील भोंदू, मतलबी, स्वार्थी हिंदुत्ववाद्यांना आमचा थेट सवाल आहे.
भाजपाची सत्ता असलेल्या आसाम, त्रिपुरा मधून घुसखोरी होत नाही. मग घुसखोरी कुठून होते? उबाठाच्या प्रिय दिदी ममता दीदींची सत्ता असलेल्या पश्चिम बंगाल मधून बांग्लादेशीयांची घुसखोरी सुरु आहे. या राज्यात सीमा सुरक्षा दल (BSF) तैनात करण्यास दिदींचा विरोध आहे. उबाठा मग तुमच्या प्रिय दिदींना का विचारत नाही घुसखोरी बद्दल? असा सवाल अँड शेलार त्यांनी केला आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात