सातबारा व इतर जमीन अभिलेखातील त्रुटींमुळे Farmer ID न मिळालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दस्तऐवज पडताळणी आणि AgriStack नोंदणीची प्रक्रिया दर्शविणारे प्रतीकात्मक चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा……!

२.३१ लाख शेतकऱ्यांच्या ‘ॲग्रीस्टॅक’ नोंदणीचा मार्ग मोकळा; कर्जमाफीसह शासकीय योजनांचा लाभ मिळणे होणार सुलभ….. सर्व पात्र शेतकऱ्यांना अधिकृत रेकॉर्डवर आणण्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश मुंबई  — सातबारा उताऱ्यावर किंवा इतर अधिकार अभिलेखात नाव नसल्यामुळे विविध शासकीय योजनांपासून वंचित राहणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय बुधवारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यानुसार अशा सर्व […]

शेतकरी नेते रविकांत तुपकर नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी ₹२ लाख प्रोत्साहन अनुदानाची मागणी करताना. महाराष्ट्र ताज्या बातम्या

“नियमित कर्ज भरून आम्ही पाप केलंय का?” : रविकांत तुपकरांचा संतप्त सवाल

₹५० हजार नव्हे, ₹२ लाख प्रोत्साहन अनुदानाची मागणी, अन्यथा पुन्हा महाराष्ट्र पेटेल राज्यव्यापी दौऱ्यातून नव्या आक्रमक आंदोलनाचे संकेत; नियमित कर्जदार शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी बुलडाणा: संपूर्ण कर्जमुक्तीसाठी अन्नत्याग आंदोलन, विधानभवनावर धडक, मंत्रालयासमोर झाडावर चढून सरकारला दिलेला इशारा आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या निर्णायक बैठकीनंतरही शेतकऱ्यांचे प्रश्न कायम असल्याचा आरोप करत शेतकरी नेते रविकांत […]

महाराष्ट्र विधानभवन, आचारसंहितेचे प्रतीकात्मक दस्तऐवज, कर्जमाफी आणि शैक्षणिक सवलतींसंबंधी सरकारी फाइल्स दर्शविणारे संपादकीय चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

आचारसंहितेतच मोठ्या घोषणा कशा?: अनंत गाडगीळ यांचा सवाल  

मुंबई: महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असताना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी ३६ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा आणि नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन विकासासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद यांसारखे महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय जाहीर कसे करण्यात आले, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते आणि माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना […]

Farmers in Marathwada face diesel shortages and crop loan uncertainty ahead of the kharif season. महाराष्ट्र ताज्या बातम्या

चार महिन्यांत 293 शेतकरी आत्महत्या; डिझेल टंचाई आणि रखडलेल्या पीककर्जामुळे मराठवाड्यात चिंता

खरीप हंगाम तोंडावर असताना इंधनटंचाई, कर्जमाफीतील विलंब आणि वाढते आर्थिक संकट शेतकऱ्यांसमोर नवे आव्हान उभे करत आहे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र अद्याप थांबलेले नाही. जानेवारी ते एप्रिल 2026 या अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत तब्बल 293 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. वाढते कर्ज, शेतीमालाला न मिळणारा पुरेसा भाव, डिझेल टंचाई आणि पीककर्ज वितरणातील अनिश्चितता यामुळे […]