आचारसंहितेतच मोठ्या घोषणा कशा?: अनंत गाडगीळ यांचा सवाल
मुंबई: महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असताना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी ३६ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा आणि नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन विकासासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद यांसारखे महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय जाहीर कसे करण्यात आले, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते आणि माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना […]
