स्मार्ट मीटरवरून जयंत पाटील आक्रमक; मुख्यमंत्री फडणवीसांकडे प्रकल्पाच्या फेरआढाव्याची मागणी
मुंबई: राज्यातील स्मार्ट मीटर प्रकल्पावरून निर्माण झालेल्या वादाने आता राजकीय स्वरूप धारण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिले, दंड आकारणी आणि ग्राहकांवर होत असलेल्या कथित आर्थिक परिणामांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. राज्यातील अनेक भागांत स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिलांमध्ये अनपेक्षित वाढ […]
