महाराष्ट्र ताज्या बातम्या

अनधिकृत बांधकामांना शासनाची माफी नाही; पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

मुंबई – राज्य सरकार कोणत्याही अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणार नाही. कोणी अधिकारी अशा बांधकामांना संरक्षण देत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिला.

भाजप आमदार पराग अळवणी यांनी मुंबईतील अनधिकृत बांधकामांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबईतील सर्व अनधिकृत बांधकामांची यादी तयार करून त्याचे वर्गीकरण करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिका आयुक्तांना दिले जातील.

शिंदे यांनी स्पष्ट केले की, विलेपार्ले (पूर्व) येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या भूखंड क्रमांक २५६ वर अनधिकृत शेड आणि नंतर अनधिकृत वाहनतळ उभारण्यात आले होते. महानगरपालिकेने त्यावर कारवाई केली आहे. वसई-विरार महापालिका क्षेत्रातही अनेक अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली असून, काही प्रकरणांत न्यायालयीन स्थगितीमुळे ती बांधकामे तात्पुरती शिल्लक आहेत.

राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, अनधिकृत बांधकामांवर एमआरटीपी कायद्यानुसार कारवाई केली जाते. सदस्यांनी त्यांच्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची माहिती दिल्यास त्वरित कारवाई केली जाईल. संबंधित अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

या चर्चेदरम्यान सदस्य योगेश सागर, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, वरुण सरदेसाई, मुरजी पटेल, अजय चौधरी, बाळा नर यांनीही उपप्रश्न विचारले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात