महाराष्ट्र ताज्या बातम्या

परमवीर सूबेदार जोगिंदर सिंह मार्गाचा नामफलक पुन्हा बसवला: अनिल गलगलींच्या पाठपुराव्याला यश

मुंबई: अंधेरी (पूर्व) येथील चिमटपाडा परिसरात Inconica हॉटेलपासून अंधेरी-कुर्ला मार्गापर्यंतच्या रस्त्याचे नामकरण परमवीर चक्र विजेते सूबेदार जोगिंदर सिंह मार्ग असे करण्यात आले होते. मुंबई महापालिकेने या मार्गावर नामफलकही बसवला होता. मात्र, सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान तो हटवण्यात आला आणि दीर्घकाळ नव्याने लावण्यात आला नव्हता.

ही बाब लक्षात आल्यानंतर आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी के/पूर्व विभागाचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांच्याकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली. श्री. शुक्ला यांनी याची गंभीर दखल घेत अवघ्या ४८ तासांत नामफलक पुन्हा बसवण्याची कार्यवाही केली.

या तातडीच्या प्रतिसादाबद्दल अनिल गलगली यांनी मनःपूर्वक आभार मानले. सदर माहिती स्थानिक समाजसेवक साहब सिंह आणि सरबजीत सिंह यांनी गलगली यांच्यापर्यंत पोहोचवली होती. नव्याने बसविण्यात आलेल्या नामफलकाचे उद्घाटन आमदार पटेल मूरजी यांच्या हस्ते पार पडले.

परमवीर चक्र विजेते सूबेदार जोगिंदर सिंह : बुमलाचे रणसिंह

१९६२ च्या भारत-चीन युद्धात अरुणाचल प्रदेशातील बुमला पोस्ट वर तैनात असलेल्या सूबेदार जोगिंदर सिंह यांनी अतुलनीय शौर्याचे प्रदर्शन केले. २० ऑक्टोबर १९६२ रोजी चीनच्या सुमारे २०० सैनिकांनी अचानक हल्ला केला. तेव्हा फक्त काही भारतीय जवान तिथे तैनात होते.

गंभीर जखमी होऊनही सूबेदार सिंह शेवटपर्यंत लढत राहिले. स्वतःच्या मांडीला गोळी लागल्यानंतरही त्यांनी थांबणे नाकारले आणि स्वतः पट्टी बांधून पुन्हा समोरासमोर लढाई केली. अनेक चीनी सैनिकांना ठार केल्यानंतर अखेर ते चीनच्या ताब्यात गेले. त्यानंतर भारत सरकारने त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान केले.

त्यांच्या पराक्रमाने प्रभावित झालेल्या चीननेही त्यांच्या अस्थी सन्मानपूर्वक १९६३ मध्ये परत केल्या. त्यांच्या शौर्याचे स्मरण म्हणून मुंबईतील रस्त्याला त्यांचे नाव देणे हे अत्यंत गौरवाचे आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात