महाराष्ट्र ताज्या बातम्या

संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना अटक; सखोल चौकशी होणार – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई – संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत जाहीर केले.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी गेले असताना प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर शाई ओतण्यात आली, त्यांना गाडीतून बाहेर खेचून काळे फासण्यात आले. हा प्रकार म्हणजे जिवे मारण्याचाच प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यांनी यासंदर्भात विधानसभेत स्थगन प्रस्तावाची सूचना दिली.

वडेट्टीवार यांनी सांगितले की, हल्ला करणारा आरोपी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असून, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याच्यावर पिस्तूल बाळगण्याचा गुन्हाही दाखल आहे तसेच चुलत भावाची हत्या केल्याप्रकरणी त्याने कारावास भोगला आहे. अशा प्रकारचा हल्ला होऊ शकतो, याची माहिती गुप्तचर विभागाला नव्हती का? कार्यक्रमासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त का नव्हता? यावरही त्यांनी सवाल उपस्थित केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तरात सांगितले की, या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई केली असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात