महाराष्ट्र ताज्या बातम्या

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण : हुंडा छळ, राजकीय प्रतिष्ठा आणि पोलिसांच्या निष्क्रीयतेविरोधात ‘आप’ महिला आघाडीचे तीव्र आंदोलन

पुणे : वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर आज ‘आम आदमी पार्टी’च्या महिला आघाडीतर्फे गुडलक चौकातील कलाकार कट्ट्याजवळ तीव्र आंदोलन करण्यात आले. “हुंड्याला राजकीय प्रतिष्ठा नको, हुंडा छळा विरोधात कठोर कारवाई करा, वैष्णवीला न्याय मिळवा” या मुख्य मागण्यांसह आंदोलनकर्त्यांनी दोषींवर तात्काळ कडक कारवाईची मागणी केली.

पुणे शहर महिला अध्यक्ष सुरेखा भोसले यांनी म्हटले की, “मंजुश्री सारडा खून प्रकरणाला ४५ वर्षे झाली, तर कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्यासही दोन दशके उलटली तरी महिलांवरील हुंड्यासाठीचा छळ सुरूच आहे. वैष्णवीसारख्या मुलींना आत्महत्येस प्रवृत्त केलं जातं, हे अत्यंत लज्जास्पद असून, सहा दिवस उलटूनही गुन्हेगार मोकाट फिरत आहेत, हे गृहखात्याचे अपयश आहे.”

‘आप’च्या कार्यकर्त्या श्रद्धा शेट्टी यांनी महिलांना पोलिस यंत्रणेवर अजिबात विश्वास वाटत नसल्याचे सांगितले. महिला आयोगही केवळ ईमेलपुरतेच मर्यादित असल्याने त्याची विश्वासार्हता डळमळीत झाली आहे, असा आरोप त्यांनी केला.

‘आप’चे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले की, “राजकीय प्रतिष्ठा जपण्यासाठी नेत्यांकडून लग्नात महागड्या गाड्या दिल्या जातात, याचा चुकीचा संदेश समाजात जातो. गुंडांना राजकीय वरदहस्त मिळतो, यामुळे राज्यातील बहिणी अजूनही असुरक्षित आहेत. पुरुषप्रधान राजकीय बडेजाव आणि सत्तेचा गैरवापर याला आळा घालण्याची वेळ आली आहे.”

शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी सक्षम आणि कर्तबगार महिलेला नेमण्याची मागणी यावेळी केली.

प्रमुख उपस्थिती : आप महिला आघाडीच्या पूजा वाघमारे, माधुरी गायकवाड, सुप्रिया बोबडे, उज्वला रोडगे, संगीता बागल, मुमताज शेख, उर्मिला वांजळे, अंजना वांजळे, सरुबाई वांजळे यांच्यासह शेखर ढगे, संजय कटारनवरे, राजेश ओवाळ, कीर्तीसिंग चौधरी, निलेश वांजळे, सुभाष करांडे, शंतनू पांडे, मनोज शेट्टी, शुभम इंगळे, संतोष काळे, सतीश यादव, सय्यद अली, शंकर थोरात, सुशील बोबडे, आप्पा कोंढाळकर हे कार्यकर्ते उपस्थित होते.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात