महाराष्ट्र

छान झाले,दांभिकांची,पंढरी उद्‌ध्वस्त झाली…?

उध्दव ठाकरेंना आशिष शेलार यांचे जशास तसे उत्तर……!

कविवर्य सुरेश भटांची जी कविता आज उद्धव ठाकरे यांनी वाचली त्याच कवितेतील पुढची ओळ उद्घोषीत करुन मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी मंगळवारी प्रदेश कार्यालयांत पत्रकारांशी बोलताना अगदी सडेतोड व जशास तसे उत्तर दिले.छान झाले,दांभिकांची, पंढरी उद्ध्वस्त झाली,यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही !अशा ओळीत त्यांनी कविवर्य सुरेश भट यांच्या कवितेचा दाखला दिला.

ठाकरे यांनी नाशिक येथून त्यांच्या पक्षाच्या महा मेळाव्यात सत्ताधारी भाजप,पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर केलेल्या टिकेला उत्तर देताना आ.अँड.शेलार यांनी म्हणाले की, गोदातीरी उभं राहून श्रीमान उध्दव ठाकरे यांनी वल्गना केली की, भाजपाला राममुक्त करायये आहे. तुम्ही काय ही ओवेसीं कडून सुपारी घेतली आहे का?भारतीय मनातून राम वेगळा काढायला ओवेसीच्या बापाला तरी जमेल काय?भाजपाचे बाप म्हणून वंदनीय शामाप्रसाद मुखर्जी यांनी कुणाशी युती केली त्याचा जाब आम्हाला आज विचारताय?आमचाच सवाल तुम्हाला आहे की, शिवसेना स्थापन करणाऱ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे तुम्ही काय केलेत?सख्या भावासह चुलत भावालाही घराबाहेर बाहेर काढणाऱ्या श्रीमान उध्दव ठाकरे यांना रामायणातील वाली,सुग्रीव अशी बरीच पात्र आठवतात.. पण रामाच्या पादूका सिंहासनावर ठेवून राज्य करणारा भरत तुम्हाला का आठवत नाही?असा थेट सवालही शेलार यांनी केला.

खा.संजय राऊत हे जेवढे बोलतात तेवढा त्यांचा पक्ष कमी कमी होत जातोय.बहुतेक नँनोत मावेल एवढा पक्ष म्हणजे शिल्लक गट उरेल,अशी त्यांची इच्छा आहे बहुतेक.त्यामुळे खा.संजय राऊत यांची महाराष्ट्रभर भाषणे उबाठाने ठेवावीत,असा टोलाही यावेळी शेलार यांनी लगावला.

Also Read: अंतिम मतदार यादीत नवमतदारांच्या टक्क्यात लक्षणीय वाढ

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात