महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या हितासाठी सशक्त बियाणे कायदा आणणार – कृषी राज्यमंत्री आशीष जैस्वाल यांची विधानसभेत घोषणा

मुंबई – राज्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन, बियाणे संदर्भात शेतकरी वर्गाला अपेक्षित असलेल्या तरतुदींचा समावेश असलेला सशक्त कायदा सरकार करणार असल्याची घोषणा कृषी राज्यमंत्री आशीष जैस्वाल यांनी आज विधानसभेत केली.

भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज सभागृहात ‘बियाणे (महाराष्ट्र सुधारणा) अशासकीय विधेयक’ मांडले. त्यांनी लक्ष वेधले की, राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा विषय अतिशय गंभीर आहे आणि त्यामागील प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे मिळणारी निकृष्ट बियाणे. सध्या अस्तित्वात असलेल्या बियाणे कायद्यात सुधारणा करून तो अधिक प्रभावी करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री जैस्वाल म्हणाले, “हा विषय राज्यासाठी अत्यंत गंभीर आहे. राज्यातील ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. नुकतीच वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत यासंदर्भात बैठक झाली असून लवकरच मुख्यमंत्री यांच्याशीही चर्चा होणार आहे. या मुद्द्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बियाणे कायद्यात लवकरात लवकर सुधारणा करण्यात येईल.”

राज्यमंत्री जैस्वाल यांच्या या घोषणेनंतर समाधान व्यक्त करत सुधीर मुनगंटीवार यांनी आपले अशासकीय विधेयक मागे घेतले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात