महाराष्ट्र ताज्या बातम्या

महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा – मंत्री अतुल सावे

मुंबई: इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत विविध महामंडळांच्या माध्यमातून राज्यातील ओबीसी समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांद्वारे लाभार्थ्यांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन, वित्तीय मदत आणि आवश्यक सुविधा पुरवण्यात येतात. राज्यातील तरुणांनी या योजनांचा स्वयंस्फूर्तीने लाभ घेत स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले आहे.

मंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, तसेच अन्य उपकंपन्यांच्या संचालक मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

या वेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव ए. बी. धुळाज, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक रवींद्र पेटकर, वसंतराव नाईक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रताप पवार, तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मंत्री श्री. सावे यांनी पुढील महत्त्वाचे निर्देश दिले:
• महामंडळांच्या योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे.
• सर्व उपकंपन्यांच्या कार्यालयांसाठी जागा उपलब्धतेबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.
• योजनांची माहिती प्रभावीपणे देण्यासाठी दिनदर्शिका (कॅलेंडर) तयार करण्यात यावी.
• महामंडळांचे सर्व बँक व्यवहार राष्ट्रीयकृत बँकेतच ठेवावेत.

या बैठकीत यापूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीच्या इतिवृत्तास मंजुरी देण्यात आली. तसेच महामंडळाच्या संचालक मंडळावर नवीन संचालकांची निवड करण्याच्या कार्यवाहीलाही मंजुरी देण्यात आली.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात