महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यात मार्च-एप्रिलमध्ये ४७९ शेतकरी आत्महत्या; मदत फक्त मोजक्यांनाच, शेतकरी कुटुंबांना वाढीव मदतीचा प्रस्तावही नाही – मदत व पुनर्वसन मंत्र्यांचा खुलासा

मुंबई – मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. मार्च २०२५ मध्ये राज्यात एकूण २५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील) यांनी विधानसभेत आज लेखी उत्तराद्वारे मान्य केले. याचप्रमाणे एप्रिल महिन्यातही २२९ आत्महत्यांची नोंद झाली आहे. म्हणजेच केवळ दोन महिन्यांत ४७९ शेतकरी आत्महत्यांचे गंभीर चित्र समोर आले आहे.

मार्च महिन्यातील माहिती:

मार्च २०२५ मध्ये नोंदवण्यात आलेल्या २५० आत्महत्या प्रकरणांपैकी केवळ १०२ प्रकरणे शासनाच्या निकषांनुसार पात्र ठरवण्यात आली. त्यामध्येही ७७ कुटुंबांनाच प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. उर्वरित २५ पात्र प्रकरणांतील मदतीसंबंधी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय, ६२ प्रकरणांना अपात्र ठरवण्यात आले असून, ८६ प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे.

एप्रिल महिन्यातील माहिती:

एप्रिल २०२५ मध्ये २२९ शेतकरी आत्महत्या प्रकरणांपैकी केवळ ७४ प्रकरणे पात्र, ३१ अपात्र आणि तब्बल १२४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. पात्र ठरलेल्या ७४ प्रकरणांतील केवळ ३३ कुटुंबांनाच आतापर्यंत आर्थिक मदत देण्यात आली असून, उर्वरित ४१ प्रकरणांमध्ये अद्याप कार्यवाही सुरु आहे.

या संपूर्ण विषयावर कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार व इतर ३४ आमदारांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर लेखी उत्तर देताना मंत्री मकरंद जाधव यांनी ही माहिती दिली.

वाढीव मदतीबाबत सरकारचा नकार:

शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबियांना वन्य प्राणी हल्ल्यांत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना मिळणाऱ्या वाढीव मदतीच्या धर्तीवर मदत देण्याचा कोणताही प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन नाही, असे स्पष्ट करून सरकारने अशा कुटुंबांवरील दुहेरी अन्याय अधोरेखित केला आहे.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात