महाराष्ट्र

जैन महामंडळ हे युवकांना उद्योजक बनविण्याबरोबरच समाज विकासाचे माध्यम ठरेल – ललित गांधी

महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेऊन स्थापन केलेले ‘जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ’ जैन युवकांना उद्योजक व रोजगारक्षम बनविण्याबरोबरच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठीचे प्रमुख माध्यम ठरेल असे प्रतिपादन महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले.

जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ च्या सह्याद्री अतिथीगृहातील वसंतदादा पाटील सभागृहात संपन्न झालेल्या संचालक मंडळाच्या प्रथम बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.

या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष मितेश नाहटा, संचालक अरविंद शाह, सदस्य रावसाहेब पाटील, सुनील पाटणी, अल्पसंख्यक मंत्रालयाचे उपसचिव मोईन ताशिलदार, व्यवस्थापकीय संचालक जी.पी.मगदुम, विशेष निमंत्रित हितेशभाई मोता, जैन फेडरेशन चे संदिप भंडारी, दिलीप परमार, महावीर जैन, गोपाल रूणवाल उपस्थित होते.

ललित गांधी यांनी बैठकीला संबोधित करताना सांगितले की, जैन समाजासाठी अशा प्रकारचे स्वतंत्र महामंडळ स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असुन जैन समाजातील विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी महत्वपूर्ण भुमिका महामंडळ बजावणार असुन जैन समाजाच्या विकासातील हे महत्वपूर्ण पाऊल असणार आहे.

या बैठकीत जैन विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण, बेघर लोकांसाठी गृह कर्जाची योजना, व्यापार-उद्योगासाठी सवलतीच्या दरातील कर्ज योजना, शेतकर्‍यांसाठी विशेषतः समहु शेतीसाठी प्रोत्साहन योजना, जैन साधु-साध्वी विहार व्यवस्था, तीर्थक्षेत्र विकास या विषयी निर्णय घेण्यात आले. तसेच जैन पाठशाला सक्षमीकरणासाठी व विहारधाम निर्माण करण्यासाठी सर्वेक्षण अहवाल बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. नवनिर्वाचित मुख्यमंत्री नाम. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री नाम. एकनाथजी शिंदे, नाम. अजितदादा पवार यांच्या निवडीबद्दल अभिनंदनाचा ठराव ही संमत करण्यात आला.

अल्पसंख्यक मंत्रालयाचे उपसचिव मोईन ताशिलदार यांनी मार्गदर्शन केले. व्यवस्थापकीय संचालक जी.पी.मगदुम यांनी सुत्रसंचालन केले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात