महाराष्ट्र ताज्या बातम्या

तरच मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल : हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर हल्लाबोल!

मुंबई – “जातीनिहाय जनगणना झाली, तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते,” असा ठाम दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. टिळक भवन येथे घेतलेल्या या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत, जातीनिहाय जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्याची मागणी केली.

“जातीनिहाय जनगणना ही केवळ आकडेवारी नव्हे, तर सामाजिक न्यायाचा पाया आहे,” असे सांगत त्यांनी म्हटले की, “राहुल गांधी यांनी ‘ज्यांची संख्या तेवढी भागीदारी’ हा विचार मांडून देशात एक सामाजिक परिवर्तनाचा अजेंडा राबवला आहे. ओबीसी, मराठा, पाटीदार, धनगर आणि गुर्जर यांसारख्या अनेक मागास घटकांचा आरक्षणाचा प्रश्न याच माध्यमातून सुटू शकतो.”

सपकाळ म्हणाले, “राज्यात जर जातनिहाय जनगणना झाली, तर ओबीसी लोकसंख्येचे प्रमाण ६४ टक्क्यांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे सरकारने तातडीने प्रशिक्षित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या साहाय्याने ही प्रक्रिया पार पाडावी.”

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात