महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीग्रस्त भागांतील मदतकार्याला गती

मुंबई : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने लक्ष ठेवून असून, संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे, त्या भागांमध्ये तातडीने पंचनामे करून मदतकार्यास गती देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि आपत्ती निवारण कक्षाशी थेट संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

राज्यातील प्रमुख भागांतील परिस्थिती:
• पुणे जिल्हा:
• दौंड – 117 मिमी, बारामती – 104.75 मिमी, इंदापूर – 63.25 मिमी पावसाची नोंद.
• बारामतीत 25 घरे अंशतः पडली. पुरात अडकलेल्या 7 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली. 70 ते 80 कुटुंबांचे स्थलांतर.
• इंदापुरात 2 जणांना वाचविण्यात आले.
• सातारा जिल्हा (फलटण):
• 163.5 मिमी पावसाची नोंद. एनडीआरएफची चमू तैनात. दुधेबावी गावाजवळ अडकलेल्या 30 नागरिकांना निवास व भोजनाची सुविधा देण्यात आली.
• सोलापूर जिल्हा:
• 67.75 मिमी पावसाची नोंद. माळशिरस तालुक्यात 6 जणांना सुरक्षितस्थळी हलवले.
• पंढरपूरमध्ये भीमा नदी पात्रात अडकलेल्या 3 जणांचे बचावकार्य सुरू.
• रायगड:
• वीज पडून एका नागरिकाचा मृत्यू. महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद.
• मुंबई:
• मागील 24 तासांत 135.4 मिमी पावसाची नोंद.
• 6 ठिकाणी पाणी साचले, 18 ठिकाणी शॉर्टसर्किट, 5 ठिकाणी भिंत कोसळल्याच्या घटना.
• कोणतीही प्राणहानी नाही. मुंबई महापालिका, अग्निशमन दल, पोलीस आणि इतर यंत्रणा सज्ज.
• 5 ठिकाणी एनडीआरएफच्या टीम तैनात.
• पुढील 24 तासांत विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार राज्य प्रशासन पूर्ण तयारीत असून, आपत्कालीन मदत कार्य तत्काळ सुरू करण्यात आले आहे.

विवेक भावसार

विवेक भावसार

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे. Vivek Bhavsar is an investigative journalist with over three decades of experience covering Maharashtra politics, governance, and public policy. He is the Founder and Editor of TheNews21 and The Rajkaran (राजकारण)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात