महाराष्ट्र ताज्या बातम्या

’सारथी’, ‘महाज्योती’, ‘आर्टी’मध्ये प्रवेश आता फक्त गुणवत्तेवर – अजित पवारांचा निर्णय

ajit pawar

मुंबई : राज्यातील महत्वाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये आता गुणवत्तेच्या आधारेच प्रवेश दिला जाईल, अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. यामध्ये ‘सारथी’, ‘महाज्योती’, ‘बार्टी’ आणि ‘आर्टी’ या संस्थांचा समावेश आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, या सर्व संस्थांच्या कार्यपद्धतीत समानता आणि सुसूत्रता आणली जाणार असून, त्यासाठी लवकरच निर्णायक निर्णय घेतले जाणार आहेत.

विधान परिषद सदस्य संजय खोडके आणि अभिजित वंजारी यांनी सारथी संस्थेच्या घरभाडे भत्ता आणि आकस्मिक निधी वितरण संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले,
“२०१८ ते २०२५ दरम्यान सारथीमार्फत ८३ अभ्यासक्रमांसाठी ३ लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आल्या. मात्र, त्यापैकी फक्त १ टक्का म्हणजे ३ हजार विद्यार्थ्यांनी पीएचडी प्रवेश घेतला, आणि त्यावर २८० कोटी रुपये खर्च झाला. एका विद्यार्थ्यावर सरासरी ३० लाख रुपयांचा खर्च, ही बाब गंभीर आहे.”

ते पुढे म्हणाले की, यापुढे रोजगारक्षम अभ्यासक्रमांनाच प्राधान्य दिले जाईल. यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे आणि लवकरच विद्यार्थ्यांची संख्या, शिष्यवृत्ती रचना, प्रवेश प्रक्रिया यामध्ये एकसमान धोरण लागू करण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या करिअर व शैक्षणिक संधींमध्ये आमूलाग्र बदल होणार असून, अनावश्यक खर्च आणि गैरव्यवहाराला आळा बसणार आहे, असे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे.

गुणवत्तेला प्राधान्य देणारी पारदर्शक यंत्रणा या निर्णयातून उभी राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात