महाराष्ट्र ताज्या बातम्या

Maratha Reservation : “मराठा आरक्षणाला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फडणवीस जी, ७ दिवसात आरक्षण देण्याचं काय झालं?” – हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: “मराठा आरक्षण देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते, आणि ती भाजपा व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाही. सत्ता दिल्यास ७ दिवसात आरक्षण देतो अशी घोषणा त्यांनी केली होती, पण आजपर्यंत काहीच झालेले नाही,” असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

सपकाळ म्हणाले, “मराठा समाजाला दिलेलं आरक्षण फडणवीस सरकारने सुप्रीम कोर्टात इम्पिरिकल डेटा न दिल्यामुळे गेले. आज सरकार आंदोलकांना बदनाम करत आहे. प्रत्यक्षात मुंबईतील परिस्थितीसाठी भाजपा सरकारच जबाबदार आहे. तीन महिने आंदोलनाची घोषणा असूनही सरकार झोपले होते.”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. “शिंदे यांनी आंदोलकांच्या पाया पडून शपथ घेतली, जीआर काढण्याचं आश्वासन दिलं. गुलाल उधळला आणि आंदोलक घरी परतले. मग त्या आश्वासनाचं काय झालं? आजही ते सत्तेत आहेत. मराठा समाजाला दिलेला शब्द पाळता येत नसेल तर सत्तेतून बाहेर पडावं,” अशी मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार हे नेहमीच दिल्लीला जातात, पण मराठा आरक्षणासाठी ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याचा ठोस प्रयत्न करत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. “जातनिहाय जनगणना काँग्रेसशासित तेलंगणा, कर्नाटकमध्ये झाली. महाराष्ट्रातही तशीच करावी. गरज पडल्यास तेलंगणाचे मुख्यमंत्री मार्गदर्शन करतील,” असेही ते म्हणाले.

सपकाळ यांनी ठामपणे सांगितले की, “काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. ते फडणवीस सरकार टिकवू शकले नाही. आरक्षण हा राजकीय नाही तर सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे. जर भाजपा युती सरकारला निर्णय घेता येत नसेल, तर पायउतार व्हावे; आम्ही प्रश्न सोडवू.”

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात