महाराष्ट्र ताज्या बातम्या

Uddhav Thackeray : उध्दव सेनेचा निवडणूक शंखनाद – बंद दाराआड रणनीतीने विरोधकांमध्ये खळब

मुंबई– मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. सत्ता समीकरणं, आगामी निवडणुकीच्या हालचाली आणि पक्षातील आतल्या गोटातील चर्चांनी वातावरण तापवलं आहे. यामध्येच उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अचानक मुंबईतील विभागप्रमुखांना मातोश्रीवर बोलावल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्व मोठ्या पक्षांत चर्चा सुरू आहेत. कोण कुणासोबत जाणार, कोणावर विश्वास, कोणावर हल्ला – या समीकरणात आता ठाकरे गटाने केलेली हालचाल विरोधकांमध्ये कुजबुज निर्माण करणारी ठरली आहे. त्यामुळेच या बैठकीत नेमकं कोणत्या मुद्द्यांवर रणनीती आखली जात आहे याबाबत तर्कवितर्क रंगले आहेत.

मुंबई नेहमीच राजकीय दृष्ट्या निर्णायक ठरलेली आहे. इथल्या निवडणुकांवर राज्यातील सत्तेची दिशा ठरते, असं अनेकदा सिद्ध झालं आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या या बैठकीत कोणते निर्णय होतील, कोणाला कोणती जबाबदारी मिळेल, आणि निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीची दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माहितीनुसार, संघटन मजबूत करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. मात्र, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणनितीबाबत सविस्तर चर्चा झाल्याचेही समजते. यामुळे ठाकरे गटाने निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने तयारी सुरू केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात