महाराष्ट्र ताज्या बातम्या

मंत्रालयात “आमदार कक्ष” स्थापन करा – आमदार विलास तरे यांची मागणी

मुंबई/पालघर: मंत्रालयात आमदारांसाठी स्वतंत्र “आमदार कक्ष” स्थापन करून संगणक, प्रिंटर व इतर आवश्यक कार्यालयीन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आमदार विलास तरे यांनी मुख्यमंत्री तथा सामान्य प्रशासन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार तरे म्हणाले की, राज्यात २८८ आमदार व ७८ विधानपरिषद सदस्य अशा एकूण ३६६ लोकप्रतिनिधींना विविध प्रश्नांसाठी मंत्रालयात यावे लागते. विभागीय अधिकाऱ्यांशी व मंत्र्यांशी संपर्क साधताना निवेदनं तयार करणे, दुरुस्ती करणे, झेरॉक्स काढणे किंवा पत्रव्यवहार करणे यासाठी कोणतीही स्वतंत्र सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे आमदारांचे स्वीय सहाय्यक बाहेरच्या दुकानांवर अवलंबून राहतात, जे वेळखाऊ व सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अडचणीचे ठरते.

त्यामुळे मंत्रालय परिसरात “आमदार कक्ष” उभारून संगणक, प्रिंटर, इंटरनेट कनेक्शन, झेरॉक्स मशीन, बसण्याची व्यवस्था आणि सहाय्यक कर्मचारी अशी सुविधा उपलब्ध करून द्यावी. या सोयींमुळे आमदार व त्यांचे सहाय्यक निवेदनं वेळेवर तयार करून मंत्र्यांशी अधिक कार्यक्षमतेने संपर्क साधू शकतील, असे आमदार तरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्य सचिव राजेश कुमार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

विवेक भावसार

विवेक भावसार

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे. Vivek Bhavsar is an investigative journalist with over three decades of experience covering Maharashtra politics, governance, and public policy. He is the Founder and Editor of TheNews21 and The Rajkaran (राजकारण)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात