महाराष्ट्र ताज्या बातम्या

देशभक्तीच्या प्रकाशात उजळला के.जे. सोमय्या महाविद्यालयाचा 66 वा वर्धापन दिन

’शहीद कॅप्टन विनायक गोरे’ लघुनाटिकेचा 5000 वा प्रयोग • जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप ठरले प्रेरणास्त्रोत

मुंबई : विद्याविहार येथील के.जे. सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचा ६६ वा वर्धापन दिन देशभक्तीच्या भावनेत साजरा झाला. यावेळी ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी गेल्या ३० वर्षांपासून अखंड सादर करत असलेल्या ‘शहीद कॅप्टन विनायक गोरे’ या एकपात्री लघुनाटिकेचा ५००० वा प्रयोग सादर करून प्रेक्षकांना भारावून टाकले.

१९९५ मध्ये जम्मू-काश्मीर सीमेवर शहीद झालेल्या कॅप्टन विनायक गोरे यांच्या शौर्यावर आधारित या नाटिकेतून देशभक्तीचा संदेश देत सानप यांनी तीन दशकांत विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा जागवली आहे. या प्रयोगातून अनेक युवक सैन्यात दाखल झाले, तर काहींनी रक्तदान, अवयवदान आणि सैनिकांच्या कुटुंबांसाठी कार्य सुरू केले.

कार्यक्रमात प्राचार्य डॉ. किशन पवार यांच्या हस्ते डॉ. पवन अग्रवाल, वीरमाता अनुराधा गोरे, माजी मुख्याध्यापिका सुमन शिवाजी सानप, हिंदी साहित्य क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार विजेते डॉ. सतीश पांडे, लेफ्टनंट कर्नल सतीश कुमार सिंग, भाजप प्रदेश उपाध्यक्षा वर्षा भोसले, तसेच इतर माजी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार झाला.

वीरमाता अनुराधा गोरे म्हणाल्या, “मनोज सानप यांनी तीस वर्षे ही नाटिका अखंड सादर करून देशभक्तीची मशाल पेटती ठेवली आहे. यातून असंख्य युवकांना प्रेरणा मिळाली आहे.” माजी मुख्याध्यापिका सुमन शिवाजी सानप यांनी सानप यांच्या बालपणापासूनच्या प्रवासाविषयी अनुभव सांगितले, तर डॉ. पवन अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना योग्य ध्यास आणि कृतीद्वारे यश संपादन करण्याचे मार्गदर्शन केले.

उपप्राचार्य डॉ. सत्यवान हणेगावे यांनी प्रगती अहवाल, तर माजी विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस शिजो पॉल यांनी वार्षिक अहवाल सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक सिमरन महतानी यांनी केले. शेवटी डॉ. मीरा वेंकटेश यांनी आभार मानले आणि राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात