महाराष्ट्र ताज्या बातम्या

श्रीरंग सुर्वे यांना ‘कोकण रत्न’ पुरस्कार जाहीर; कोविड काळातील कार्याची दखल

मुंबई : गेले तीन दशके पत्रकारितेत कार्यरत असलेले कोकणातील सुपुत्र श्रीरंग सुर्वे यांना यंदाचा ‘कोकण रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे अध्यक्ष संजय कोकरे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

कोकणच्या दृष्टीनं प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या या पुरस्काराबाबत बोलताना संजय कोकरे यांनी सांगितले की, “श्रीरंग सुर्वे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून केलेली सातत्यपूर्ण समाजसेवा आणि लोकहिताची बांधिलकी लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे.”

श्रीरंग सुर्वे यांनी मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघात सरचिटणीस, उपाध्यक्ष आणि सल्लागार अशी विविध जबाबदाऱ्या भूषवल्या आहेत. कोविड काळात त्यांनी केलेल्या कार्याची, नागरिकांना दिलेल्या सहाय्याची आणि सातत्याने केलेल्या माहितीसेवेची दखल म्हणून रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट कडूनही त्यांचा गौरव करण्यात आला होता. ते राहतात त्या परिसरातही त्यांनी समाजसेवेची परंपरा जोपासली आहे.

पत्रकारितेच्या माध्यमातून विविध सामाजिक, प्रशासकीय आणि लोकजीवनाशी निगडित विषयांवर त्यांनी परखड मते आणि विश्लेषणात्मक लेख सतत मांडले आहेत. कोकणाच्या पर्यटन विकासासाठी त्यांनी केलेले विशेष लेखनही उल्लेखनीय आहे.

सर्वांगीण कार्य, सामाजिक बांधिलकी आणि पत्रकारितेतील योगदान विचारात घेऊन सुर्वे यांच्या नावावर ‘कोकण रत्न’ पुरस्कार निश्चित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. हा पुरस्कार १३ डिसेंबर २०२५ रोजी, सायंकाळी मुंबई मराठी पत्रकार संघात प्रदान केला जाणार आहे.

योगेश त्रिवेदी

About Author

योगेश त्रिवेदी (Yogesh Trivedi) हे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. त्यांनी सामना या प्रखर हिंदुत्ववादी आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या मराठी वृत्तपत्रात सर्वाधिक काळ पत्रकारिता केली.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात