महाराष्ट्र ताज्या बातम्या

धान उत्पादकांना न्याय हवा; चंद्रपूरला कृषी विद्यापीठाची मागणी — मुनगंटीवारांचे विधानसभेत सरकारला खडे बोल

नागपूर – “आपण पक्षाच्या जाहीरनामा समितीचे सदस्य होतो… त्यामुळे शेतकऱ्यांप्रती भावना तीव्र आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा,” अशी ठाम मागणी भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत पुरवणी मागण्या सादर करताना केली.

धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करण्याची तातडीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. “चार दिवस विदर्भाचे मीठ खाल्ले… त्या मिठाला तरी जागा,” असा शालजोडीतला टोलाही त्यांनी सरकारला लागला.

मुनगंटीवार यांनी रेती कंत्राटे देण्याच्या पद्धतीवरही जोरदार हल्ला चढवला. “रेती कंत्राटे नागपूरमधील लोकांनाच का? कारण करप्शन मॅनेजमेंट आमच्याकडच्या लोकांना जमणार नाही… रात्रीत मान्यतेच्या तिप्पट रेती उचलता येणार नाही,” असा गंभीर आरोप त्यांनी सभागृहात केला.

त्याचबरोबर त्यांनी सुचवले की,  रेती बांधकामासाठी मोफत उपलब्ध करून द्या, ज्या प्रमाणात रेती लागेल, त्यावर स्वतंत्र ‘सेस’ लावा.  “जनतेला सज्जन राहू द्या, चोर बनवू नका,” असा तीव्र शब्दांत त्यांनी सरकारला सुनावले.

कृषी विभागात संगणक यंत्रांची खरेदी आणि अंमलबजावणी कासवगतीने का चालली आहे, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारला विचारले की, “चिखलात राबणाऱ्या भात शेतकऱ्यांना चांगला संदेश द्या. विजय केळकर समितीच्या शिफारशी स्वीकारा.”

मुनगंटीवार म्हणाले, “चंद्रपूर जिल्ह्यात संशोधनासाठी आवश्यक जागा उपलब्ध आहे. त्यामुळे येथे स्वतंत्र कृषी विद्यापीठाची आजच घोषणा करा.” सभागृहातील चर्चेत त्यांच्या या मागण्यांनी सरकारवर दबाव वाढविला असून ग्रामीण आणि कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या प्रश्नांना नव्याने अधोरेखित केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

1 Comment

  1. Antony Twiss

    December 11, 2025

    Hey, I think your blog might be having browser compatibility issues. When I look at your website in Chrome, it looks fine but when opening in Internet Explorer, it has some overlapping. I just wanted to give you a quick heads up! Other then that, wonderful blog!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात