महाराष्ट्र ताज्या बातम्या

धुळे शहरासाठी AI आधारित ‘Safe Dhule – Secure Dhule Mission’चा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर  

धुळे : राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी महाराष्ट्राच्या २०२६ च्या अर्थसंकल्पात AI आधारित पोलिसिंग, आधुनिक CCTV प्रणाली आणि तंत्रज्ञानाधारित स्मार्ट निगराणी व्यवस्थेला प्राधान्य देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर धुळे शहरासाठी AI आधारित “Safe Dhule – Secure Dhule Mission” राबविण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

धुळे येथील जागरूक नागरिक व सामाजिक कार्यकर्ता जयेश संगिता दिनेश बाफना यांनी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला असून शहरात आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि प्रतिबंधात्मक सुरक्षा व्यवस्था उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे.

या प्रस्तावानुसार धुळे शहरातील प्रमुख चौक, महत्त्वाचे रस्ते, व्यापारी भाग तसेच सार्वजनिक ठिकाणी अत्याधुनिक CCTV कॅमेरे बसविणे, AI आधारित संशयास्पद हालचालींचे विश्लेषण, वाहन क्रमांक ओळख प्रणाली (ANPR) आणि एकात्मिक कमांड व कंट्रोल सेंटर उभारण्याचा विचार मांडण्यात आला आहे.

अशा प्रकारची तंत्रज्ञानाधारित व्यवस्था उभारल्यास गुन्हेगारीवर नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन सुधारणा, संशयास्पद किंवा हरवलेल्या वाहनांचा शोध तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देणे अधिक प्रभावीपणे शक्य होऊ शकते, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

धुळे हे उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रशासकीय आणि व्यापारी केंद्र मानले जाते. शहराच्या वाढत्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आधुनिक व प्रतिबंधात्मक सुरक्षा प्रणाली उभारणे आवश्यक असल्याचे या प्रस्तावात अधोरेखित करण्यात आले आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे सविस्तर प्रस्ताव पाठविण्यात आला असून धुळे शहरात “Safe Dhule – Secure Dhule Mission” हा उपक्रम पायलट प्रकल्प म्हणून राबविण्याचा विचार करावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

हा उपक्रम राबविण्यात आल्यास धुळे शहरासाठी तंत्रज्ञानाधारित शहरी सुरक्षा व्यवस्थेचे प्रभावी मॉडेल विकसित होऊ शकते, ज्याचा विस्तार भविष्यात राज्यातील इतर शहरांमध्येही करता येईल, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात