X : @therajkaran
नागपूर: उत्पादनांवर हलालचा शिक्का हे भारतीय अर्थव्यवस्थेवरील हे फार मोठे आक्रमण आहे. त्यामुळे मांस-मटण वगळता महाराष्ट्रात हलाल प्रमाणपत्रावर कडक बंदी असावी, अशी मागणी शिवसेना सदस्य प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत केली. औचित्याच्या मुद्द्याआधारे सरनाईक यांनी हा विषय उपस्थित केला.
आजपर्यंत ‘हलाल’ आणि ‘झटका’ हा प्रकार केवळ मटक व्यवसायामध्ये होता; मात्र काही आस्थापना कपडे, सौंदर्य प्रसाधने यांवरही हलालचा शिक्का मारत आहेत, याकडे सरनाईक यांनी लक्ष वेधले. याविषयीची कागदपत्रेही त्यांनी सभागृहात सादर केली. हलाल प्रमाणपत्र देणार्या या आस्थापनांनी अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या संघटनांना आर्थिक साहाय्य केले आहे. या आस्थापनांच्या संकेतस्थळावर याविषयीची माहिती आहे. जर्मन बेकरी बाँबस्फोट प्रकरणातील आरोपींना या आस्थापनांकडून आर्थिक साहाय्य करण्यात आले. या गंभीर प्रकाराकडे जातीने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. उत्तरप्रदेश शासनाने १८ नोव्हेंबर २०१३ या दिवशी हलाल प्रमाणपत्रावर बंदी घातली. त्याप्रमाणेच महाराष्ट्रातही व्हावी. कपडे आणि मटण-मांस वगळता अन्य खाद्यपदार्थांवर हलाल शिक्क्याची आवश्यकता काय? असा सवाल त्यांनी केला.
Also Read: इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आराखडा तयार करणार – मंत्री उदय सामंत