मुंबई
धारावी बचावच्या नाऱ्यासह शिवसेना उद्धव ठाकरे गट आज शनिवारी धारावीत भव्य मोर्चा काढणार आहेत. स्वत: उद्धव ठाकरे यांनी मोर्च्याचं नेतृत्व करण्याची घोषणा याआधीच केली आहे. धारावीमध्ये मोठ्या संख्येने पोस्टर्स लावले आहेत.
ठाकरे गटाचे नेता आणि माजी आमदार बाबुराव माने यांनी शुक्रवारी मीडियाशी बोलताना सांगितलं की, हा मोर्चा धारावी टी जंक्शनपासून सुरू होऊन अडाणींच्या कार्यालयापर्यंत असेल. शनिवारी निघणारा मोर्चा हा विराट असेल ज्यात दीड ते दोन लाख लोक सामील होतील, असा दावा त्यांनी यावेळी केला. धारावीतील प्रत्येक घर या मोर्चात सहभागी होईल, असंही म्हटलं जात आहे.
धारावी बचाव समितीने सांगितलं की, उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात धारावीच्या रहिवाशांना ४०० चौ.फुटाचं घर देण्याचा प्रस्ताव करण्यात आला होता. मात्र तेव्हा एसआरएकडून विकासकांना इतकी सवलत देण्यात आली नव्हती. जितका फायदा आणि सवलत अदानींना दिली जात आहे. यासाठी आता धारावीच्या रहिवाशांना ५०० चौ. फुटांचं घर मिळायला हवं.
धारावी बचाव समितीची अशीही मागणी आहे की, धारावनीचा पुनर्विकास अदानी किंवा इतर कोणी खासगी उद्योग समूहाकडून नाही तर सरकारी संस्था म्हाडाकडून करवून घ्यावी. धारावीत ज्यांचा व्यवसाय आहे, त्यांना त्याच ठिकाणी व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. धारावीत कुंभारवाडा आणि अन्य व्यवसाय वर्षानुवर्षांपासून सुरू आहेत. त्यांचं पुनर्वसन तेथेच केलं जावं. धारावीचं पुन्हा सर्वेक्षण करावं आणि त्याच्या आधारावर लोकांना घरं दिली जावीत.