ताज्या बातम्या महाराष्ट्र

रविकांत तुपकर आक्रमक, शेतकऱ्यांच्या ताफ्यासह विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा

नागपूर

सोयाबीन-कापसाला भाव मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी विधानभवनावर मोर्चा पुकारला आहे. विधानभवनाच्या प्रवेश द्वारावर जवळ उभे राहून त्यांनी ताफ्यासह आत येण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना तेथे पोलिसांकडून अडवण्यात आलं. सह्याद्रीवर पियुष गोयल यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं होतं, मात्र ते पूर्ण केलं नसल्याचा आरोप तुपकरांनी यावेळी केला.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे महाराष्ट्रासाठी पनौती आहेत, असा हल्लाबोल तुपकरांनी मुख्यमंत्र्यावर केला. कापूर आणि सोयाबीन या दोन्ही पिकांच्या दरात घट झाली असून शेतकऱ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. नुकसानभरपाई आणि पीक विम्याचे पैसे तत्काळ जमा करावे, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.

तुपकरांनी गेल्या महिन्यात (नोव्हेंबर) सोबायीन-कापूस उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी चार दिवस अन्नत्याग करीत आंदोलन पुकारलं होतं. यानंतर त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते वारंवार राज्य सरकारसोबत बैठका घेत आहेत. मात्र अद्याप या प्रश्नावर कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात