ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘रामावर एवढं प्रेम असेल तर सीतामाईचं संरक्षण करा’, जयंत पाटलांचा हल्लाबोल

नागपूर

आज हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी सभागृहात सरकारला धारेवर धरलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह जयंत पाटील यांनीही प्रश्नांची सरबत्ती केली.

गेल्या काही दिवसात राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आपलं राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. महिलांची सुरक्षा धोक्यात आली असून देशात भारतात पहिल्यांदाच राम अवतरत आहे की काय असं वातावरण आहे. रामावर एवढं प्रेम असेल तर सीतामाईचं संरक्षण करा, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी भाजपवर निशाणा साधला.

जयंत पाटील पुढे म्हणाले, राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. आतापर्यंत आपण बिहार राज्याविषयी बोलत होतो. मात्र आता आपल्या राज्यात अशी स्थिती उद्भवली आहे. दुसरीकडे राज्यात ड्रग्सचं जाळं वाढलं असून उडता पंजबा, उडता महाराष्ट्र झालाय.

नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यास गृहमंत्री अपयशी – अंबादास दानवे
मागील ५ वर्षांपासून भाजपची सत्ता असतानाही आजही विदर्भाच्या प्रश्नांवर, विकासावर ठोस व कालबध्द कार्यक्रम सरकारने जाहीर केला नाही. गेले ५ वर्षे विदर्भाचा अनुशेष बाकी का आहे? विदर्भात मोठया प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहेत. नागपुरमध्ये महिला अत्याचार, खून दरोडे या सारख्या गुन्ह्यात वाढ झाली असून येथील तरुण पिढी ही व्यसनाधीनतेकडे वळतेय. नागपूरचे पालकमंत्री हे गृहमंत्री असूनही त्यांच्या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यास ते अपयशी ठरल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात