ताज्या बातम्या महाराष्ट्र

आजीचा आशीर्वाद अन् भाकरी-चटणीचं गाठोड, सर्व शब्दांच्या पलीकडले; अमोल कोल्हेंचा भारावून टाकणारा अनुभव

पुणे

शेतकरी आक्रोश मोर्चानिमित्ताने खासदार अमोल कोल्हे सध्या गावागावांमध्ये फिरत आहेत. महाविकास आघाडीचा हा मोर्चा शिवनेरीपासून सुरू झाला आहे.

कांदा निर्यात बंदी, दुधाचे कोसळलेले दर यासाठी हा शेतकरी आक्रोश मोर्चा काढल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. शिरूरमध्ये जात असताना जातेगाव येथे एका वृद्ध आजीने खासदार अमोल कोल्हे यांच्या चेहऱ्यावरुन हात फिरवला आणि भाकरीचा तुकडा-चटणी भरवलं त्यांचं तोंडभरून कौतुक केलं.

गावकऱ्यांनी दिलेलं प्रेम पाहून अमोल कोल्हेही भारावले. यावेळी अनेक महिलांनी त्यांचं औक्षण केलं. वृद्ध आजीने त्यांच्या चेहऱ्यावर, डोक्यावरुन हात फिरवला.. कसा आहेत बाबा उन्हातान्हात फिरतोस.. किती शेतकऱ्यांची काळजी करतोय असं म्हणून ईश्वर तुझं भलं करो असा आशीर्वाद दिला. सोबत कापडात गुंडाळलेली चटणी-भाकरीच्या शिदोरीचं गाठोडं दिलं. आणि भाकरीचा तुकडा आणि चटणी खाऊ घातली.

हा अनुभव शब्दांच्या पलीकडचा असल्याची भावना अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली. शेतकरी आक्रोश मोर्चाचा प्रवास हा असंख्य अनुभवांनी भारावून टाकणारा आहे. माता भगिनींचे असंख्य आशीर्वाद, त्यांच्या हाताने भारावलेला मायेचा घास आणि खूप साऱ्या शुभेच्छा हे सारं शब्दांच्या पलीकडचं आहे. युष्यात चढ उतार असंख्य येतील पण या आशीर्वादांचं वैभव सदैव गाठीशी असेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात