ताज्या बातम्या महाराष्ट्र

PHD फेलोशीपचा पेपर फोडण्याचे कारस्थान केले का? वडेट्टीवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल

पुणे

सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थांच्या पीएचडी फेलोशीप मिळवण्यासाठी आज १० जानेवारी रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. मात्र या परीक्षेत पुण्यातील वडगाव, नागपूर येथील केंद्रांवर सील पॅक केलेली प्रश्नपत्रिका न देता फोटोकॉपी देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला. यानंतर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर निशाण साधला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विचारले होते Phd करून दिवे लावणार का?
प्रामाणिक परीक्षार्थींनी दिवे लावू नये म्हणून थेट आज PHD फेलोशीपचा पेपर फोडण्याचे कारस्थान केले का? असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे.

यापुढे वडेट्टीवार म्हणाले की, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री असलेलं महायुती सरकार काय काय दिवे लावत आहे हे महाराष्ट्रातील जनता आणि युवा बघत आहे. ही परीक्षा दोन वेळा घेतली आणि दोन्ही वेळा घोळ घालण्यात आला आहे. आरोपींवर कारवाईची मागणी केली तर गृहमंत्री साहेब पुरावे आणून द्या म्हणतात. तलाठी परीक्षेच्या निकालावर प्रश्न उपस्थित केले तर महसूल मंत्री कारवाईची धमकी देतात. आता यावेळी कारवाई करा, परीक्षार्थींना धमकी देऊ नका.

यापुर्वीही घातला होता बहिष्कार
यापूर्वी २४ डिसेंबर २०२३ रोजी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांच्यातर्फे पीएचडी फेलॉशीपसाठी पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबादारी सावित्रीबाई फुले पुणे विभागाच्या सेट विभागावर होती. मात्र ही प्रश्नपत्रिका सेट २०१९ च्या प्रश्नपत्रिकेप्रमाणे जशीच्या तशी असल्याचं आढळलं. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या आक्षेपानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर १० जानेवारी रोजी पुन्हा परीक्षा घेण्यात आली. मात्र यंदाही नागपूर, पुणे केंद्रावर सील न केलेल्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने विद्यार्थ्याने यावर बहिष्कार घातला.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात