ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्र्यांसोबत हातात भगवा घेतलेले हे महात्मा कोण? संजय राऊतांचा आणखी एक फोटोबॉम्ब

मुंबई

मुख्यमंत्र्यांचे विविध गुंडांसोबतचे फोटो पोस्ट करीत संजय राऊतांकडून मोठा सवाल उपस्थित केला जात आहे. आज राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत एक गुंड हातात भगवा घेऊन उभा असल्याचा दावा केला आहे. त्या व्यक्तीवर खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, अपहरण असे गुन्हे असून मोक्कामधून नुकताच तो बाहेर आल्याचं संजय राऊतांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात गुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य, मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत असे गुंड त्यांच्या पक्षात प्रवेश करीत आहेत, असा घणाघात यावेळी त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने शुभेच्छा दिल्याचा फोटो सोमवारी समोर आल्याने खळबळ उडाली होती. आधीच शिंदे गटाच्या शहराध्यक्षावर गोळीबार करणारा गणपत गायकवाड याने एकनाथ शिंदेंवर गुंडशाहीला खतपाणी घातल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर अजित पवार यांची पिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला असिफ मुहमंद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढीची भेट झाली, याचाही एक फोटो समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यातील गुंड निलेश घायवळ यांच्यासोबतचा फोटो समोर आला आहे. आता पुन्हा एकदा संजय राऊतांनी एक फोटो पोस्ट केला आहे.

संजय राऊतांची टीका…
पुण्याचे नवे पोलीस आयुक्त महोदयांनी काल म्हणे गुंडांची परेड घेऊन इशारा दिला. राजकारण्यांच्या आसपास फिरकायचे नाही वैगरे..छान! काही गुंड टोळ्या आणि त्यांचे प्रमुख मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत थेट मिंधे गँग मध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांची परेड काढणार काय? हातात भगवा घेतलेले हे महात्मा कोण आहेत? हा पुण्यातला गुन्हेगार आहे. याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न, चोरी, अपहरण असे गुन्हे आहेत व मोक्का मधुन नुकताच बाहेर आला आहे. महाराष्ट्रात गुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य! (काल सरकारचे बाळराजे कोठे होते?त्यांच्या खास गँग बरोबर सुलतानपूर रिसॉर्टमध्ये साग्र संगीत बरेच काही करीत होते. या राज्याचे कठीण आहे)

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात