महाराष्ट्र ताज्या बातम्या

होळकर-शिंदे-पवार-गायकवाड राज घराण्यांचा इतिहास पुस्तकरूपाने प्रकाशित करणार : मंत्री दीपक केसरकर

X: @therajkaran

मुंबई: मराठी भाषा आज देशभरात अनेक प्रदेशात आजही बोलली जाते. ती जतन करण्याचे मोठे काम महाराष्ट्राबाहेरील अनेक मराठी संस्थांनांमुळे झाले. त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजच्या पिढीला या संस्थानांचा इतिहास कळावा यासाठी त्यासंबंधी पुस्तके प्रकाशित व्हावीत, अशा सुचना दिल्या आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे इंदूर, शिंदे यांचे ग्वाल्हेर, धारचे पवार, गायकवाड यांचे बडोदा, सरफोजीराजे भोसले यांचे तंजावर या संस्थांनांनी विशेषतः महाराष्ट्राबाहेर मराठी भाषा जतन करण्याचे मोठे काम केले. त्या भागात आजही मराठी भाषा बोलली जाते. भावी पिढीला याविषयीची माहिती व्हावी, यासाठी या राजघराण्यांचा इतिहास पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे केसरकर म्हणाले.

शालेय शिक्षणमंत्री म्हणाले, दक्षिण आणि पूर्व आशियामध्ये भारतीय संस्कृतीचा झालेला प्रसार यासंबंधीही पुस्तके प्रकाशित व्हावीत, असे प्रयत्न करण्यात येत आहेत. उत्कृष्ट अशा १०० साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे, अशी माहितीही या वेळी शिक्षणमंत्री केसरकर यांनी दिली.

Also Read: माजी मंत्री रोहिदास पाटील यांची प्रकृती बिघडली; कोल्हापूरात उपचार सुरु

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात